Wednesday, July 16, 2014

वैदिक सुंता

काँग्रेसने लावलेले धर्मनिरपेक्षतेचे रोपटे आता चांगले फोफावून त्याला रसाळ गोमटी फळे लगडू लागली आहेत. असेच एक गोंडस गोजिरवाणे रसाळमधुर फळ म्हणजे वैदिक. खूप दिवस हे फळ उंचावर फांद्यांमध्ये लपून राहिले होते. काँग्रेसी धर्मनिरपेक्षतेच्या वृक्षाची ही फळे वैशिष्टयपूर्ण गुणधर्माची आहेत. अनेक दिवस कच्चे असलेले फळ इशाऱ्यासरशी पिकून खाली पडते आणि त्याच्या परिपक्वतेच सुगंध आसमंतात दरवळतो. या फळाचा मूळ रंग भगवा असतो, पण जसजसे हे फळ पिकत जाते तसे त्याचा रंग हिरवा होत जातो. पी. व्ही. नरसिंहरावांच्या वेळी धरलेले फळ पिकायला इतकी वर्षे लागली. नाही म्हणायला काँग्रेसच्या ब तुकडीबरोबर हे बालक आपनृपति केजरीसिंहांच्या गळ्यात गळा घालून फोटो काढून घेताना दिसले होते. वाममार्गी, चुकलो, वामपंथी (वाटेला पंथ म्हटले की राजमार्ग होतो) अपचनमुखी सीताराम येचुरी हेही त्या फोटोत काखा वर करून उभे होते. तेव्हा हा गुटगुटीत इसम रबडी विकणारा असून फावल्या वेळात गंगेच्या घाटावर पंड्येगिरी करणारा असावा असे वाटले होते. अंगी नाना कळा वगैरे बाळगून असेल अशी काही शंका आली नव्हती. त्या फोटोत, केजरीरामांच्या प्रभावळीमुळे हा वानर फिका पडला होता. येचुरीतर सदैव दुर्मुखी. चुकून स्वत:चा हसरा चेहरा पाहिला तर ते स्वत:वरच चिडतात असे ऐकले आहे. डाव्यांनी कसे नेहमी असंतुष्ट राहावे, सदैव अन्याय होऊन राहिला आहे असा चेहरा ठेवावा असे काहीसे शिक्षण बहुधा दिले जात असावे. या अद्भुत युतीचे पुढे काय झाले कळले नाही, पण "आपलेच घोडे आणि जाऊद्या पुढे" वृत्तीचे तिघे एकत्र आल्यावर घोडेच काय गाढवसुद्धा बसकण मारील. ही तथाकथित धर्मांध शक्तींच्या विरोधातील मंडळी ज्या विचाराला, धर्माला धर्मांध म्हणत आहेत त्याच धर्माच्या सहिष्णुतेमुळे त्यांना हे करायला मिळत आहे हे विसरतात. हिंदू हा धर्म कधीच नव्हता, नाही. तो एक विचार आहे. प्रत्येकाला स्वतंत्रपणे विचार करू देणारा आहे. संघाने केवळ तोच विचार मांडला. प्रखर राष्ट्रवाद, देशप्रेम या मध्यवर्ती संकल्पना ठेवून नि:स्वार्थी काम करणारी संघटना म्हणजे संघ. मी लहानपणापासून शाखेत जात होतो. जसे जात हा शब्द कधी शाखेत ऐकला नाही तसेच मुसलमानांना शत्रू माना असेही शाखेत कधी ऐकले नाही. संघात येण्यासाठी राष्ट्र ही संकल्पना मान्य असणे आणि निर्विवाद देशप्रेम या दोनच गोष्टी आवश्यक आहेत असे मला वाटते. मग तो कोणत्याही धर्माचा असो. हिंदूधर्माचा आणि राष्ट्राचा अभिमान हा मुसलमान द्वेष होत नाही. या निर्बुद्ध वैदिकसारखी मंडळी ते सिध्द करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही असो, मुळात प्रश्न संघ आणि मुसलमान असा नाहीच आहे. जो मनुष्य दहशतवादी म्हणून सिध्द झाला आहे, ज्याने २६/११ सारखा भयानक हल्ला देशावर घडवून आणला, त्याची भेट हा इसम कोणत्या अधिकारात घेतो? या मनुष्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप का ठेवू नये? लोकशाही आहे म्हणून कुणीही उठतो आणि मनाला येईल ते करतो. ही कसली लोकशाही? पत्रकारशुचिता हा शब्द आता लुप्त झाला आहे. आता ज्या प्रकारे पत्रकारिता केली जाते ते पाहून तिचा उपयोग शस्त्र, साधन म्हणून केला जातो आहे असे दिसते. लोकशाहीमध्ये लोकांना जाणून घेण्याचा अधिकार आहे या सबबीखाली हे पत्रकार लोक निर्लज्जपणे धंदा करत असतात. होय, आता पत्रकारिता हा एक मान्यताप्राप्त व्यवसाय राहिला नसून धंदा झाला आहे. पण मला वाटते राष्ट्रद्रोह करण्यासाठीसुध्दा एक प्रकारची द्वेषी का होईना मानसिकता लागते. वैदिक यांच्याकडे तेवढी बुद्धी नक्कीच नाही. लोकशाहीमध्ये सर्व लोकांचे प्रतिनिधित्व मान्य असते. त्यात विचारी, अविचारी, गुणी, दुर्गुणी, काही नितांत मूर्ख आणि वैदिक यांच्यासारखे वैचारिक सुंता झालेले मूर्ख लोकही आले.

प्रश्न असा पडतो की या रबडीप्रताप वैदिकाला आताच हा उपद्व्याप का सुचला असावा? अनेक वर्षे पत्रकारिता करून प्रसिद्धी न मिळाल्याचा परिणाम की बोलवत्या धन्याचा इषारा पाळण्याचा प्रयत्न? हे नक्कीच एक षडयंत्र आहे. पापस्तानात जाणे, सईद हाफिज या दहशतवादी गुन्हेगाराची भेट घेणे, त्यासंबंधी मीडियावर यथेच्छ सार्वजनिक बोंब ठोकणे ही वैदिक या इसमाची वैयक्तिक कुवत असूच शकत नाही. याला नक्कीच भारतातीलच कुणीतरी मदत केली आहे किंवा आपण मागे राहून याला पुढे केले आहे. आणि हा इसम केवळ प्रसिद्धी मिळेल या लालसेने हे सर्व करण्यास तयार झाला आहे. भारताचा इतिहास आहे. परधार्जिणे, राज्यद्रोही हरामखोर भारताने भरपूर पाहिले आहेत. पण या वैदिकसारखा मूर्ख हरामखोर पहिलाच. मूर्ख म्हणून सोडून द्यायचा की हरामखोर म्हणून थोबाडून काढायचा असा प्रश्न पडला आहे. असो, भावना, देशप्रेम, धारातीर्थी पडलेले जवान हे सगळे बाजूला ठेवून विचारूया, कशासाठी हे सगळे केले? त्याचेही उत्तर मिळत नाही. हा इसम टीव्हीवर आला आणि अखंड वेळ अगम्य शब्दात भुंकत होता. जर काही बाजू असेलच, तर ती मांडायची संधी लोकशाहीनेच दिली होती, तीसुद्धा याला वापरता आली नाही. याचे कारण एकच, काही बाजूच अस्तित्वात नाही. ती असूच शकत नाही. दहशतवाद्याचे समर्थन करताच येणार नाही. हिंसा हा ज्यांचा मार्ग आहे त्यांना आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांना उत्तर मात्र लोकशाही मार्गाने द्यावे लागते हे केवळ दुर्दैवी आहे. बलात्कार करणाऱ्यांचे "लहान मुले आहेत ती, चुका करणारच" असे समर्थन करणारा मुल्ला मुलायम सिंग आणि दहशतवाद्याला मिठ्या मारणारा वैदिक यांच्यात फरक नाही. बेजबाबदार आणि राष्ट्राला घातक अशी विधाने किंवा कृती करणाऱ्यांना जबर शिक्षा होण्याची गरज आहे. यापुढे दहशतवादाचा कोणताही त्रास झाल्यास प्रथम या वैदिकला टायरमध्ये टाकून चौकशी करावी. मुलायम आणि वैदिक यांची वैचारिक सुंता तर झालीच आहे, त्यांना विनंती आहे की या लोकांनी टीव्हीवर सार्वजनिक सुंता करून घ्यावी. च्यानेलवाल्यांचा टीआरपी वाढेल, लोकांना करमणूक मिळेल आणि या लोकांना सुंत्याचे समाधान. तुका म्हणे ऐशा नरा, मोजून माराव्या पैजारा.

No comments:

Post a Comment