लीलाबाईंनी हाती घेतलेला नवीन प्रोजेक्ट - भजीपाव-चटणी. यात लसूण चटणी आणि
खोबऱ्याची चटणी यांच्यात द्वंद्वगीत रंगवले असून शेवटी दोन्ही चटण्या
हातमिळवणी करून पावाचे भजे करतात असे दाखवले आहे. मराठी अस्मिता म्हटले की
ओघाने द्वंद्व आलेच. लीलाताईंनी आधीच्या प्रोजेक्टमधून मिळालेल्या धड्याला स्मरून यावेळी मात्र "बटाटा आणि कांदा भजी" याविषयात अधिकारी असणारे "महाराष्ट्र भजी केंद्र" (बाजीराव रस्ता, नाना फडणीस वाड्यासमोर. पूर्वेला. पश्चिमेला नव्हे, तिथे मयताचे पास मिळतात) यांचे मार्गदर्शन घेतले आहे. त्याचे प्रत्यंतर सिनेमात वारंवार येते. भजीपावाचे पात्र भावे यांनी रंगवले आहे. त्यांच्या केसातून गळत असलेले मुबलक तेल पाहून हे भजे अस्सल मराठीच यात शंका राहत नाही आणि येथेच लीलाबाईंच्या दिग्दर्शनाला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. लसणाच्या चटणीचे पात्र बर्वीण बाईंनी (हो तीच ती,
येरे घना येरे घना असं म्हणून आपण मात्र भाव खा रे माझ्या मना म्हणणारी)
छान रंगवले आहे. हातवारेफेम सचिन यांनी शेवटी सगळ्याचे (इथेही) खोबरे केले आहे. चांगल्या अर्थाने. नारळ चांगला वाजला तर खोबरे चांगले, बद्द वाजला तर खऊट. सिनेमाचे तसेच असते. कट्यार काळजातून केव्हाच बाहेर आली पण खांसाहेबांचे हातवारे अद्याप आतच अडकले आहेत. कट्यार पाहताना हातवारे पाहावे की खांसाहेबांच्या आठ्या पहाव्यात अशा गोड संभ्रमात प्रेक्षक पडला होता. दिग्दर्शक भावेंनी ते हातवारे इतके जिवंत केले होते की थेटरमधील पहिल्या दोन रांगा रिकाम्या राहू लागल्या होत्या. न जाणो हात आणखी पुढे आला तर कानफटीत बसायची. भजीपाव-चटणीतही तेच हातवारे सचिनने आणले आणि चटणीचे खोबरे केले.
या चित्रपटनिर्मितीमागे प्रचंड अभ्यास केला गेलेला दिसला. महाराष्ट्रात भज्यांचे महत्व प्राचीन कालापासून चालत आलेले आहे. प्राकृतात "बट्टभज्ज कृती" दिलेले किती तरी शिलालेख आज महाराष्ट्रात जागोजागी आढळतात असा शासनाच्या पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे प्रमुख एस एस दांगट यांचा दावा आहे. विक्रमोर्वशीयात एके ठिकाणी "ही ही भो णिमन्तणोवाअणेण बह्मणो विअ राअरहस्सेण फ़ुट्टमाणो ण सक्कुणोमि आइण्णे अत्तणो जीहं रख्खिदुं । ता जाव तत्तभवं वअस्सो बट्टभज्जासणादो ।" असा उल्लेखही आहे. यावरून अगदी पुरातन काळापासून गृहिणी भज्यांच्या पाककृतीत प्रवीण होत्या आणि ते एक सणावाराचे पारंपारिक पक्वान्न होते हे सिद्ध होते. नेमके हेच सूत्र लीलाबाईंना भावले. ओढा ओलांडताना धोतराचा सोगा उचलून जसा घट्ट धरून ठेवतात तसे त्यांनी ते सूत्र पूर्ण चित्रपटभर धरून ठेवले आहे. न जाणो सोगा सुटला तर काय घ्या. मराठी अस्मिता तलवार घेऊन मागे लागायची. त्यामुळे संवादासंवादात प्राचीन दाखले दिले गेले आहेत. बटाट्याचे भजी करण्यासाठी काप करत असतानाचे दृश्य हे प्रातिनिधिक आहे. बटाट्यावर क्यामेरा झूम होतो, मग धूसर होतो आणि मग जेव्हा पडदा स्पष्ट होतो तेव्हा दिसतो एक शिलालेख. खास अमिताभ बच्चन यांच्या धीरगंभीर आवाजात "महाराष्ट्र की परंपरा बहुत पुरानी है. आज से पाचहजार साल पहले, मुघलोंके घुडसवार धरतीका बलात्कार करने अभी आये नही थे, ये धरती सुजलाम सुफलाम थी, तब यहां की संस्कृती सोनेसेभी कीमती मानी जाती थी. अभ्यागत का स्वागत बडेही प्रेमभावसे किया जाता था. बटाटा या कांदा भजी ये उस संस्कृती का अविभाज्य घटक माना जाता था. यही लिखा है इस शिलालेख में… " असे शब्द ऐकू येतात. नंतर प्राकृत, अर्धमागधीवर गेली तीस वर्षे अभ्यास करणारे प्रा. घनघोर यांच्याशी थोडी चर्चा. एक पाच-दहा मिनिटे प्रेक्षकाला असं इतिहासात सचैल बुचकळून काढलं की पुन्हा फेडअवे आणि मूळ दृश्यात परत. एका दृश्यात तर सलग पाच मिनिटे (आंद्रे तारकोव्स्की, घे लेका सलग शॉटचा नमुना!) पंगतीचे दृश्य दाखवले आहे. पुरुष शुचिर्भूत होऊन पंगतीत बसले आहेत. समोर रांगोळी काढलेली, चौरंग, चांदीची तांब्या भांडी, बोटे बुडवण्यासाठी केशराच्या पाण्याची वाटी, बटाट्यात लावलेल्या उदबत्त्या असा थाट. सोवळ्यातील आचारी, वाढपी. आणि शिगोशीग भरलेली भजांची ताटे. वा! असे ब्राम्हण जेवूनी तृप्त झाले! लीलाबाईंनी यावेळी मात्र इतिहासाला सोडले नाही हं असे उद्गार काढतच प्रेक्षक सिनेमागृहातून बाहेर पडणार हे नक्की.
तेव्हा अगदी आवर्जून पहा. जेव्हा येईल तेव्हा. आम्ही लीलाबाईंच्या जवळचे असल्यामुळे हा प्रकल्प आकारास येत असताना पाहायला मिळाला. मागील वाईट अनुभवामुळे चित्रपटाच्या सुरुवातीलाच "या चित्रपटातील सर्व पदार्थ काल्पनिक असून, कोणत्याही कुटुंबावर अथवा कादंबरीवर बेतलेले नाहीत. बटाटे, कांदे, चटणी, खोबरे, मोहन, तेलकट,झारे, उलथने या नावाशी कोणतेही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. इतिहासाशी प्रामाणिक राहण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे, तरी काही चूक राहून गेली असल्यास आमच्याकडे थेट तक्रार करावी. सोशल मिडियावर आमचे वाभाडे काढू नयेत." अशी पाटी दाखवण्यात येणार असल्याचे लीलाबाई म्हणाल्या. "अइअ अइ आअअं ओ!" आम्हाला काही कळेना. प्राकृताचा अभ्यास करत करत आता प्राकृतमध्येच बोलतात की काय अशी शंका आली. "काय म्हणालात ?" आम्ही विचारलं. त्यांनी हातानेच जरा थांबा अशी खूण केली आणि त्यांनी वळून खुर्चीच्या मागेच कोपऱ्यात एक भारदस्त पिंक टाकली. आणि मग मोकळ्या तोंडाने म्हणाल्या,"म्हटलं, पब्लिक लई मारतं हो!" बाईंचा चित्रपट चांगला की सफाईने मारलेली ती पिंक चांगली याचा विचार करत आम्ही त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडलो.
या चित्रपटनिर्मितीमागे प्रचंड अभ्यास केला गेलेला दिसला. महाराष्ट्रात भज्यांचे महत्व प्राचीन कालापासून चालत आलेले आहे. प्राकृतात "बट्टभज्ज कृती" दिलेले किती तरी शिलालेख आज महाराष्ट्रात जागोजागी आढळतात असा शासनाच्या पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे प्रमुख एस एस दांगट यांचा दावा आहे. विक्रमोर्वशीयात एके ठिकाणी "ही ही भो णिमन्तणोवाअणेण बह्मणो विअ राअरहस्सेण फ़ुट्टमाणो ण सक्कुणोमि आइण्णे अत्तणो जीहं रख्खिदुं । ता जाव तत्तभवं वअस्सो बट्टभज्जासणादो ।" असा उल्लेखही आहे. यावरून अगदी पुरातन काळापासून गृहिणी भज्यांच्या पाककृतीत प्रवीण होत्या आणि ते एक सणावाराचे पारंपारिक पक्वान्न होते हे सिद्ध होते. नेमके हेच सूत्र लीलाबाईंना भावले. ओढा ओलांडताना धोतराचा सोगा उचलून जसा घट्ट धरून ठेवतात तसे त्यांनी ते सूत्र पूर्ण चित्रपटभर धरून ठेवले आहे. न जाणो सोगा सुटला तर काय घ्या. मराठी अस्मिता तलवार घेऊन मागे लागायची. त्यामुळे संवादासंवादात प्राचीन दाखले दिले गेले आहेत. बटाट्याचे भजी करण्यासाठी काप करत असतानाचे दृश्य हे प्रातिनिधिक आहे. बटाट्यावर क्यामेरा झूम होतो, मग धूसर होतो आणि मग जेव्हा पडदा स्पष्ट होतो तेव्हा दिसतो एक शिलालेख. खास अमिताभ बच्चन यांच्या धीरगंभीर आवाजात "महाराष्ट्र की परंपरा बहुत पुरानी है. आज से पाचहजार साल पहले, मुघलोंके घुडसवार धरतीका बलात्कार करने अभी आये नही थे, ये धरती सुजलाम सुफलाम थी, तब यहां की संस्कृती सोनेसेभी कीमती मानी जाती थी. अभ्यागत का स्वागत बडेही प्रेमभावसे किया जाता था. बटाटा या कांदा भजी ये उस संस्कृती का अविभाज्य घटक माना जाता था. यही लिखा है इस शिलालेख में… " असे शब्द ऐकू येतात. नंतर प्राकृत, अर्धमागधीवर गेली तीस वर्षे अभ्यास करणारे प्रा. घनघोर यांच्याशी थोडी चर्चा. एक पाच-दहा मिनिटे प्रेक्षकाला असं इतिहासात सचैल बुचकळून काढलं की पुन्हा फेडअवे आणि मूळ दृश्यात परत. एका दृश्यात तर सलग पाच मिनिटे (आंद्रे तारकोव्स्की, घे लेका सलग शॉटचा नमुना!) पंगतीचे दृश्य दाखवले आहे. पुरुष शुचिर्भूत होऊन पंगतीत बसले आहेत. समोर रांगोळी काढलेली, चौरंग, चांदीची तांब्या भांडी, बोटे बुडवण्यासाठी केशराच्या पाण्याची वाटी, बटाट्यात लावलेल्या उदबत्त्या असा थाट. सोवळ्यातील आचारी, वाढपी. आणि शिगोशीग भरलेली भजांची ताटे. वा! असे ब्राम्हण जेवूनी तृप्त झाले! लीलाबाईंनी यावेळी मात्र इतिहासाला सोडले नाही हं असे उद्गार काढतच प्रेक्षक सिनेमागृहातून बाहेर पडणार हे नक्की.
तेव्हा अगदी आवर्जून पहा. जेव्हा येईल तेव्हा. आम्ही लीलाबाईंच्या जवळचे असल्यामुळे हा प्रकल्प आकारास येत असताना पाहायला मिळाला. मागील वाईट अनुभवामुळे चित्रपटाच्या सुरुवातीलाच "या चित्रपटातील सर्व पदार्थ काल्पनिक असून, कोणत्याही कुटुंबावर अथवा कादंबरीवर बेतलेले नाहीत. बटाटे, कांदे, चटणी, खोबरे, मोहन, तेलकट,झारे, उलथने या नावाशी कोणतेही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. इतिहासाशी प्रामाणिक राहण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे, तरी काही चूक राहून गेली असल्यास आमच्याकडे थेट तक्रार करावी. सोशल मिडियावर आमचे वाभाडे काढू नयेत." अशी पाटी दाखवण्यात येणार असल्याचे लीलाबाई म्हणाल्या. "अइअ अइ आअअं ओ!" आम्हाला काही कळेना. प्राकृताचा अभ्यास करत करत आता प्राकृतमध्येच बोलतात की काय अशी शंका आली. "काय म्हणालात ?" आम्ही विचारलं. त्यांनी हातानेच जरा थांबा अशी खूण केली आणि त्यांनी वळून खुर्चीच्या मागेच कोपऱ्यात एक भारदस्त पिंक टाकली. आणि मग मोकळ्या तोंडाने म्हणाल्या,"म्हटलं, पब्लिक लई मारतं हो!" बाईंचा चित्रपट चांगला की सफाईने मारलेली ती पिंक चांगली याचा विचार करत आम्ही त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडलो.