Thursday, March 9, 2023

गजालगीता महाभारत पर्व - अस्वलोध्यायः

दुर्योधन बोलता

रे अर्जुना, धनुर्विद्या आत्मसात केलंय

फायनल एक्झामात टॉप केलंय

माशाचो डोळो फोडून द्रौपदेक पळयलंय

वर्गात पयलो इलंय..

मगे आता आमचे वांधे कशाक करतंय


बायलेक कॅडबरी काय देतंय

तेका गजरो काय हाडून देतंय

आमची बाईल म्हणता शिरां पडली

आता मी पण पाच घोव शोधतंय


अर्जुन बोलता

दुर्योधना, मांयझंया कायतरी बोला नुको

वडाची साल पिपळाक लाव नुको

तुका काय आमची दुखा ठावक

आमका अपॉइंटमेंट घेवक लागता

युधिष्ठिराक मात्र डायरेक ॲक्सेस मिळता


आज मी जरा सावध आसंय

पहिलोच जावन कृष्णाक इचारून इलंय

पयल्यांदी माका चार गाळये दिल्यान

आणि मगे अस्वलाचा पोर आणूक सांगल्यान


द्रौपदी करवादता

अगो बाये माज्या! माज्यासाटी हाडल्यानी दिसता

रवळनाथान हेंका अक्कल दिली नायशी वाटता

हंयसर बाईल रवता दोन लुगड्यांवर

आणि यांचो सातबारा कृष्णाच्या नावावर


ओ! तुमची अक्कल खंय चराक गेली काय

ह्या अस्वल घरात हाडलंत तेचा करूचा काय

थोरल्याचो हत्ती, धाकल्यांचे घोडे घरात फिरतंत

आता हो प्राणी हाडून काय सर्कस लावतसंत?


कृष्ण बोलता

रे अर्जुना, असो कसो रे तू सांगकामी

खरा अस्वल आणूक नाय सांगूक मी

पळ, आधी पावसकराच्या दुकानात धाव

कापूस भरलेलो टेडी घे, आणि करू नको भाव


अशा शब्दांत कृष्णान पुन्हा एकदा अर्जुनाक मांगरात झोपण्यापासून वाचवल्यान.


इतिश्री व्हॅलेंटाईन अस्वलोध्यायः॥


#मालवणी_गजालगीता

No comments:

Post a Comment