फिटेइइं असलं काही तरी नाव असलेली संस्था म्हणजेच फिल्म आणि टेलिव्हिजन
इन्स्टिट्यूट इंडिया आणि ती खुद्द आमच्याच थेट बुडाखालीच वसलेली आहे याचा
आम्हाला पत्ताच नव्हता. अर्थात आमचे बूड पूर्ण डेक्कन जिमखाना व्यापेल एवढे
मोठे नाही आणि फिटेइइंसुद्धा एवढी छोटी संस्था नाही हे आम्ही
खात्रीलायकरीत्या सांगू शकतो. "साहेब, जरा मोठ्या पन्ह्याचे कापड पहा" ही
आमचे टेलर निळूभाऊ (प्रोप्रा. डीलक्स टेलर्स, आम्ही चक्क शिवाशिव पाळतो)
यांची नम्र सूचना हे आमच्या प्रशस्त बुडाचे द्योतक नसून, निळूभौंच्या
दूरगामी दृष्टीचे उदाहरण आहे. वर्षाकाठी आमचा घेरा एक इंच वाढतो असे
त्यांचे म्हणणे आहे. हे असेच चालू राहिले तर वयाच्या पन्नाशीपर्यंत घेर
मोजण्यासाठी इंच संपून फूट चालू होतील असा प्रेमळ इशाराही अधूनमधून ते देत
असतात. असो. आम्ही हनुमान टेकडीवर अनेक वेळा फिरायला जात असतो. टेकडीवरून
फिटेइइंचा बोर्ड पण कदाचित पाहिला असेल, पण तिथे फिल्म वगैरे बनवण्याचे
शिक्षण मिळत असते असे काही कानावर आले नव्हते. नाही म्हणायला अधून मधून
काही दाढी वाढवलेली, कळकट कपडे परिधान केलेली तरुण पोरे दिसायची. ती एक तर
सिगारेटी फुंकत असायची किंवा रात्रीची उतरण्याची वाट पाहत शून्यात नजर
लावून बसलेली असायची. अचानक एक दिवस ही मंडळी आंदोलन वगैरे करताहेत वगैरे
कानावर येऊ लागले. आम्ही कॉलेजात असताना एक दोन दिवसांच्या कॉमन ऑफच्या
पलीकडे आमचे आंदोलन जात नसे. ही मंडळी तर नेहमीच कॉलेजच्या बाहेर असायची,
मग आंदोलन कशासाठी? तर म्हणे संस्थेचे चेअरमन म्हणून गजेंद्रसिंह हे नको
होते. गजेंद्र सिंह! हाच तो इसम ज्याने यक्षाच्या "पृथ्वीपेक्षा जड काय
आहे?" या प्रश्नाला "माता" असे उत्तर दिले होते. त्यानंतर त्याची खरी आई
"मेल्या! माझे वजन काढतोस?" असे म्हणून लाटणे घेऊन त्याच्या मागे लागली
होती असे ऐकले होते. बाकीच्या आयांनीही मोर्चे बिर्चे काढले असतील तर माहीत
नाही. थोडक्यात खरे बोलण्याच्या हव्यासामुळेच हा इसम वादग्रस्त ठरला आहे.
खरे बोलण्यामुळे कुणाचे भले झाले आहे? आताही असंच काही तरी केलं असणार आणि
ही फिटेइइंची पोरे खवळली असणार. विद्यार्थ्यांना कॉलेजबद्दल एवढी आपुलकी
काय अशीच निर्माण होते? मास्तर म्हणतील त्याच्या विरुद्ध करायचे हे
नैसर्गिकच आहे. तास चुकवू नका , वेळच्या वेळी अभ्यास करा आणि सगळ्यात
महत्वाचं म्हणजे पोरानंहो ही फिल्म इन्स्टिट्यूट आहे काही तरी ओरिजिनल करा
जीटी मारू नका, असं काही तरी हे युधिष्ठिरमहाराज म्हणाले असणार. तिथंच ही
कौरवांची सेना घायाळ झाली असणार. भ्राता युधिष्ठिर, हवं तर हवं तर आपण
भिकार सावकार खेळू पण नियम बियम नका हो पाळायला लावू.
इथे विद्यार्थ्यांचे खरे दु:ख काय होते? संस्थेच्या अध्यक्षांची निवड हा एवढा संवेदनशील मुद्दा का झाला असेल? आणि तो आताच का? ही स्वत:ला सर्जनशील वगैरे समजणारी मुले (मुले कसली तीस तीस वर्षांचे बाप्येही आहेत त्यांत) कुठले तरी अगम्य विदेशी समांतर चित्रपट पाहण्याचे होमवर्क सोडून घरचा ड्रामा करण्यात का रंगली असतील बरे? गजेंद्रसिंह यांचे कर्तृत्व युधिष्ठिराची ती भूमिका यापलीकडे नाही म्हणून? कॉलेजच्या चेअरमनच्या बौद्धिक कर्तृत्वावर विद्यार्थ्यांचे कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता तयार होत असतील तर अनेक शिक्षणसम्राटांच्या पावसाळी अळंबीसारख्या निघालेल्या कॉलेजमधून केवळ दरोडेखोर, चोर, पाकीटमार, चारित्र्यहीन असेच विद्यार्थी बाहेर पडायला हवेत. आम्हाला तर कॉलेजचे पहिले वर्ष संपेपर्यंत प्रिन्सिपॉल कोण आहेत तेच कळले नव्हते. बरेच दिवस एक इसम कॉरिडॉर मधून रोज सकाळी राउंड मारत असल्याच्या थाटात जाताना आम्ही पाहत असू. त्याच्या रुबाबावरून हेच ते प्रिन्सिपॉल असे आम्ही ठरवले होते. मग त्यांना आम्ही अदबीने "गुड मॉर्निंग सर" घालत असू. तेही न हसता "गुड मॉर्निंग" म्हणून पुढे जात. एकदा तर आमचा फ्लुईड मेक्यानिक्सच्या तासाला ते मागे येऊन बसले. सरांनीही मान तुकवून त्यांची दखल घेतली. पूर्ण वर्गात शांतता. ती पंचेचाळीस मिनिटे जणू पंचेचाळीस तास वाटले होते. पुढे मग प्रत्येक फ्लुईड मेक्यानिक्सच्या तासाला ते येऊन बसू लागले. मग मात्र त्यांची अडचण होऊ लागली. प्रेझेंटी देऊन मागच्या दाराने सटकणारे आम्ही. नेमके मागच्या दारापाशीच हे बसू लागले होते. मग आम्ही झक मारत पूर्ण तास बसू लागलो होतो. आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर असा थेट हल्ला झाल्याने आमची गोची झाली होती. मग आम्ही आंदोलन करण्याचे ठरवले. आंदोलनाचे स्वरूप काय असावे यावर चर्चा झाली. कुठल्याच तासाला न बसण्याचा ठराव मी मांडला आणि तो तात्काळ पारित झाला. प्रचंड उत्साहाने आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. आसपासच्या गावातून शिकायला आलेले, होस्टेलवर राहणारे लगेच आपापल्या गावाला पळाले. आम्ही स्थानिक विद्यार्थी रोज घरी बोंब नको म्हणून कॉलेजला येत असू पण समोर विलिंग्डन कॉलेजच्या परिसरात आमच्या कॉलेजात नावालाही न आढळणारी हिरवळ पाहत हिंडत असू. आम्ही कुणीच वर्गात हजर राहत नाही हे पाहून प्रिन्सिपॉल अस्वस्थ झाले असतील याची आम्हाला खात्री होती. असेच तीनचार दिवस झाल्यावर काय परिस्थिती आहे ते पाहायला आम्ही काही जण कॉलेजात गेलो. मुळीच कुणी अस्वस्थ वगैरे नव्हते. सर्वत्र इतर तास नीट चालू होते. आमच्या वर्गाकडे जाऊन पाहिले तर आमच्या वर्गात तास सुरू होता आणि प्रिन्सिपॉल तसेच मागच्या बाकावर बसले होते. मग मात्र आम्ही सरांनाच थेट गाठले. आणि त्यांना स्वच्छ सांगितले. "सर, तुमच्या कदाचित लक्षात आलं नसेल, गेली चार दिवस आमचा संप चालू आहे." सर म्हणाले," हो का? अरे वा! आधी तरी सांगायचं मीही तास घ्यायला आलो नसतो. सकाळी या तासानंतर एकदम दुपारी दोन वाजता तास असतो मला. बरं, ठीक चाललाय ना तुमचा संप?" असं म्हणून ते चालू लागले. आम्ही गडबडून त्यांच्या मागे धावलो,"सर! अहो थांबा! आमच्या मागण्या काय आहेत हे कुणीच विचारलं नाही!" त्यावर ते म्हणाले,"अरे संप करताहात हे कुणाला माहीत असलं तर विचारणार ना? बरं काय मागण्या आहेत? प्रेझेंटी ऑप्शनल होणार नाही. तुमच्या आधीच्या कित्येक ब्याचेसनी ती मागणी करून झालेली आहे." आम्ही व्यथित झालो. मुळात तेच दु:ख होते. पण ते दु:ख तसेच दाबून सरांना म्हणालो," सर, ते ठीक आहे. पण हे प्रिन्सिपॉलसर नेहमी तासाला येऊन बसू लागले आहेत. आमची वैयक्तिक गळचेपी होते आहे. वर्गात आम्हाला आमच्या भावना मुक्तपणे व्यक्त करता येत नाहीत. हे कधी थांबणार?" सर थोडेसे चमकले. म्हणाले,"प्रिन्सिपॉल आणि वर्गात? कधी आले होते? आणि मला कसे दिसले नाहीत?" "सर, बास का? आमचीच चेष्टा करता? सगळ्यात मागच्या बाकावर दाराजवळ बसतात ते कोण मग?" सर खो खो हसू लागले. आम्ही जरा संतापलोच. एकतर गळचेपी, त्यावर हास्य? हा लोकशाहीचा अपमान आहे. वगैरे वगैरे विचार मनात येऊ लागले. तेवढ्यात सर म्हणाले,"वत्सांनो, ते प्रिन्सिपॉल नव्हेत. ते आहेत आपल्या कॉलेजचे सीनीयरमोस्ट विद्यार्थी, ऑनरेबल श्रीयुत बाळासाहेब कोरे उर्फ बाळ्या. गेली सात वर्षे फी भरताहेत. फ्लुईड मेक्यानिक्सवर त्यांचा जीव आहे म्हणून तो विषय त्यांना सोडवत नाही. एटीकेटीवर जगताहेत." असं म्हणून तो हसून हसून डोळ्यांत आलेलं पाणी पुसत निघून गेले. आमचं आंदोलन तिथेच विसर्जित झालं. पुढे बुडलेले तास घेण्यासाठी प्रिन्सिपॉलसाहेबांच्या केबिनबाहेर आठवडाभर धरणे धरून बसलो होतो.
तेव्हा कॉलेजचे चेअरमन कोण, प्रिन्सिपॉल कोण, शिपाई कोण यावर शिक्षण ठरत नाही. घोड्याला पाण्यापाशी नेणे हे कॉलेजचे काम. ते पाणी पिणे हे घोड्याचे काम. उगाच नाही आई आमची "एवढा मोठा घोडा झालायस" अशा शब्दांत संभावना करीत असे. विद्यार्थी ज्या शिक्षकांच्या थेट संपर्कात असतात त्या शिक्षकांचा प्रभाव विद्यार्थ्याच्या जडणघडणीवर नक्की पडतो. अशा शिक्षकांचा आग्रह धरला असता तरी ते एक वेळ समजू शकले असते. पण तेही तसे फारसे बरोबर झाले नसते. कारण इथे गजेंद्रसिंहांच्या कर्तृत्वाचा मुद्दा करत आंदोलन केले गेले. पूर्वीच्या दिग्गजांची नावे घेऊन त्यांच्या तुलनेत गजेंद्रसिंह म्हणजे कोणीच नाहीत असे दाखवले गेले. अनुपम खेर सारख्या नटाने भर टीव्हीवर त्यांचा अपमान केला. अनुपम खेर यांनी तो अपमान करावा याचे हसू आले. हा नट सुरुवातीला "सारांश" सारख्या चित्रपटात गंभीर व्यक्तिरेखा करून पुढे बहुतेक सगळ्या चित्रपटांत अक्षरश: मर्कटलीला करीत जगला. "लम्हें" या चित्रपटात या इसमाने जे काही चाळे केले आहेत ते अभिनय या सदरात मोडत असतील, तसला अभिनय शिकवू नये म्हणून आंदोलन करायला हवे. तेव्हा, अभिनयाविषयी प्रेम बाळगून जर पोटतिडिकेने जर हा इसम या वादात पडला असेल तर त्याने आधी आपण पोट भरण्यासाठी किती तडजोडी केल्या हे पाहावे आणि जरा थंड घ्यावे. आधीच्या चेअरमनमध्ये श्याम बेनेगल, सईद अख्तर मिर्झा वगैरे लोकांची नावे घेतली जातात, गजेंद्रसिंहांची त्यांच्याशी तुलना केली जाते. आता बेनेगल मोठे नाव आहे, पण व्यावसायिकदृष्ट्या कितपत मोठे झाले ते? अनुपम खेरनेही त्यांच्या सिनेमापेक्षा इतर व्यावसायिक सिनेमे जास्त केले की नाही? चेअरमनचे काम आहे प्रशासनाचे. केंद्र सरकारच्या अनुदानाने ही संस्था चालते. त्यांची नेमणूक मान्य व्हायला हवी. श्याम बेनेगल चेअरमन होते म्हणून त्यावेळी विद्यार्थ्यांतून बेनेगल निर्माण झाले नाहीत किंवा यू. आर. अनंतमूर्ती होते म्हणून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली नाही.
हे आंदोलन असो, किंवा सध्या चाललेला पुरस्कार-परत करण्याचा फार्स असो, यात एक प्रकारची एकसूत्रता जाणवते. अशी आंदोलने आधी झाली नाहीत. मुद्दे तसेच होते, पण लेखकांना पुरस्कार परत करावेसे वाटले नाहीत. त्यावेळी त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर कुणी घाले घालत नव्हते. शिखांचे शिरकाण झाले तेव्हा त्यांची संवेदनशीलता बधीर होती, पण व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित असल्यामुळे पुरस्कार कपाटात चमकत होते आणि पुरस्काराची रक्कम ब्यांकेत व्याज मिळवत होती. तेवढ्यात मोदी सरकार आले आणि या व्यंकटांची खळी सांडली. आता सर्वत्र व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी दिसू लागली, सरकार उद्दाम वाटू लागले, मनमानी करणारे वाटू लागले, लोकशाही तिरडीवर बांधली गेली. थोडक्यात कॉंग्रेस लोकांना जे लोकशाहीचे फसवे वातावरण देऊन त्या पांघरुणाखाली जे काही "सरकाय लो खटिया जाडा लगे" करत होती ते या लोकांना बरे वाटत होते. आता स्वच्छ प्रशासन, शिस्त, गंभीरपणा, आचरटपणा करण्याला प्रोत्साहन नाही या गोष्टी मग लोकशाहीवर घाला वाटू लागल्या आहेत. कॉलेजमध्ये ड्रग्ज नको, सिगारेटी नकोत, दारू नको या गोष्टी आल्या की व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी वाटू लागली. सर्व स्तरावर, सर्व आघाड्यांवर मोदीविरोध हेच सूत्र यातून दिसून येते, मग यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे ओळखायला वेळ लागत नाही. जेव्हा विद्यार्थी आम्हाला चांगले प्रिन्सिपॉल पाहिजेत म्हणून आंदोलन करताना दिसतात तेव्हा ते खरे विद्यार्थी नाहीत हे कुणीही खरा विद्यार्थी (आजी किंवा माजी) ओळखेल.
खरं तर या विद्यार्थ्यांना फिल्म बनवण्याचा अप्रतिम धडा मिळाला. उगाच कुठला तरी "खंडहर" टाईप चित्रपट काढून निर्मात्याचे दिवाळे वाजवण्यापेक्षा, एकता कपूरसारखं कच्या बाराखडीचे कौटुंबिक ड्रामे करून टीआरपी वाढवणे खिशाला बरे पडते. फिटेइईंच्या विद्यार्थ्यांच्या या चाळ्याला ड्रामा एवढेच नाव देता येईल. मोदींनी या ड्राम्याला भीक घातली नाही हेच बरे झाले. ते घालणार नव्हतेच. लोकशाहीचा दुरुपयोग करणाऱ्या लोकांना हेच उत्तर बरे.
इथे विद्यार्थ्यांचे खरे दु:ख काय होते? संस्थेच्या अध्यक्षांची निवड हा एवढा संवेदनशील मुद्दा का झाला असेल? आणि तो आताच का? ही स्वत:ला सर्जनशील वगैरे समजणारी मुले (मुले कसली तीस तीस वर्षांचे बाप्येही आहेत त्यांत) कुठले तरी अगम्य विदेशी समांतर चित्रपट पाहण्याचे होमवर्क सोडून घरचा ड्रामा करण्यात का रंगली असतील बरे? गजेंद्रसिंह यांचे कर्तृत्व युधिष्ठिराची ती भूमिका यापलीकडे नाही म्हणून? कॉलेजच्या चेअरमनच्या बौद्धिक कर्तृत्वावर विद्यार्थ्यांचे कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता तयार होत असतील तर अनेक शिक्षणसम्राटांच्या पावसाळी अळंबीसारख्या निघालेल्या कॉलेजमधून केवळ दरोडेखोर, चोर, पाकीटमार, चारित्र्यहीन असेच विद्यार्थी बाहेर पडायला हवेत. आम्हाला तर कॉलेजचे पहिले वर्ष संपेपर्यंत प्रिन्सिपॉल कोण आहेत तेच कळले नव्हते. बरेच दिवस एक इसम कॉरिडॉर मधून रोज सकाळी राउंड मारत असल्याच्या थाटात जाताना आम्ही पाहत असू. त्याच्या रुबाबावरून हेच ते प्रिन्सिपॉल असे आम्ही ठरवले होते. मग त्यांना आम्ही अदबीने "गुड मॉर्निंग सर" घालत असू. तेही न हसता "गुड मॉर्निंग" म्हणून पुढे जात. एकदा तर आमचा फ्लुईड मेक्यानिक्सच्या तासाला ते मागे येऊन बसले. सरांनीही मान तुकवून त्यांची दखल घेतली. पूर्ण वर्गात शांतता. ती पंचेचाळीस मिनिटे जणू पंचेचाळीस तास वाटले होते. पुढे मग प्रत्येक फ्लुईड मेक्यानिक्सच्या तासाला ते येऊन बसू लागले. मग मात्र त्यांची अडचण होऊ लागली. प्रेझेंटी देऊन मागच्या दाराने सटकणारे आम्ही. नेमके मागच्या दारापाशीच हे बसू लागले होते. मग आम्ही झक मारत पूर्ण तास बसू लागलो होतो. आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर असा थेट हल्ला झाल्याने आमची गोची झाली होती. मग आम्ही आंदोलन करण्याचे ठरवले. आंदोलनाचे स्वरूप काय असावे यावर चर्चा झाली. कुठल्याच तासाला न बसण्याचा ठराव मी मांडला आणि तो तात्काळ पारित झाला. प्रचंड उत्साहाने आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. आसपासच्या गावातून शिकायला आलेले, होस्टेलवर राहणारे लगेच आपापल्या गावाला पळाले. आम्ही स्थानिक विद्यार्थी रोज घरी बोंब नको म्हणून कॉलेजला येत असू पण समोर विलिंग्डन कॉलेजच्या परिसरात आमच्या कॉलेजात नावालाही न आढळणारी हिरवळ पाहत हिंडत असू. आम्ही कुणीच वर्गात हजर राहत नाही हे पाहून प्रिन्सिपॉल अस्वस्थ झाले असतील याची आम्हाला खात्री होती. असेच तीनचार दिवस झाल्यावर काय परिस्थिती आहे ते पाहायला आम्ही काही जण कॉलेजात गेलो. मुळीच कुणी अस्वस्थ वगैरे नव्हते. सर्वत्र इतर तास नीट चालू होते. आमच्या वर्गाकडे जाऊन पाहिले तर आमच्या वर्गात तास सुरू होता आणि प्रिन्सिपॉल तसेच मागच्या बाकावर बसले होते. मग मात्र आम्ही सरांनाच थेट गाठले. आणि त्यांना स्वच्छ सांगितले. "सर, तुमच्या कदाचित लक्षात आलं नसेल, गेली चार दिवस आमचा संप चालू आहे." सर म्हणाले," हो का? अरे वा! आधी तरी सांगायचं मीही तास घ्यायला आलो नसतो. सकाळी या तासानंतर एकदम दुपारी दोन वाजता तास असतो मला. बरं, ठीक चाललाय ना तुमचा संप?" असं म्हणून ते चालू लागले. आम्ही गडबडून त्यांच्या मागे धावलो,"सर! अहो थांबा! आमच्या मागण्या काय आहेत हे कुणीच विचारलं नाही!" त्यावर ते म्हणाले,"अरे संप करताहात हे कुणाला माहीत असलं तर विचारणार ना? बरं काय मागण्या आहेत? प्रेझेंटी ऑप्शनल होणार नाही. तुमच्या आधीच्या कित्येक ब्याचेसनी ती मागणी करून झालेली आहे." आम्ही व्यथित झालो. मुळात तेच दु:ख होते. पण ते दु:ख तसेच दाबून सरांना म्हणालो," सर, ते ठीक आहे. पण हे प्रिन्सिपॉलसर नेहमी तासाला येऊन बसू लागले आहेत. आमची वैयक्तिक गळचेपी होते आहे. वर्गात आम्हाला आमच्या भावना मुक्तपणे व्यक्त करता येत नाहीत. हे कधी थांबणार?" सर थोडेसे चमकले. म्हणाले,"प्रिन्सिपॉल आणि वर्गात? कधी आले होते? आणि मला कसे दिसले नाहीत?" "सर, बास का? आमचीच चेष्टा करता? सगळ्यात मागच्या बाकावर दाराजवळ बसतात ते कोण मग?" सर खो खो हसू लागले. आम्ही जरा संतापलोच. एकतर गळचेपी, त्यावर हास्य? हा लोकशाहीचा अपमान आहे. वगैरे वगैरे विचार मनात येऊ लागले. तेवढ्यात सर म्हणाले,"वत्सांनो, ते प्रिन्सिपॉल नव्हेत. ते आहेत आपल्या कॉलेजचे सीनीयरमोस्ट विद्यार्थी, ऑनरेबल श्रीयुत बाळासाहेब कोरे उर्फ बाळ्या. गेली सात वर्षे फी भरताहेत. फ्लुईड मेक्यानिक्सवर त्यांचा जीव आहे म्हणून तो विषय त्यांना सोडवत नाही. एटीकेटीवर जगताहेत." असं म्हणून तो हसून हसून डोळ्यांत आलेलं पाणी पुसत निघून गेले. आमचं आंदोलन तिथेच विसर्जित झालं. पुढे बुडलेले तास घेण्यासाठी प्रिन्सिपॉलसाहेबांच्या केबिनबाहेर आठवडाभर धरणे धरून बसलो होतो.
तेव्हा कॉलेजचे चेअरमन कोण, प्रिन्सिपॉल कोण, शिपाई कोण यावर शिक्षण ठरत नाही. घोड्याला पाण्यापाशी नेणे हे कॉलेजचे काम. ते पाणी पिणे हे घोड्याचे काम. उगाच नाही आई आमची "एवढा मोठा घोडा झालायस" अशा शब्दांत संभावना करीत असे. विद्यार्थी ज्या शिक्षकांच्या थेट संपर्कात असतात त्या शिक्षकांचा प्रभाव विद्यार्थ्याच्या जडणघडणीवर नक्की पडतो. अशा शिक्षकांचा आग्रह धरला असता तरी ते एक वेळ समजू शकले असते. पण तेही तसे फारसे बरोबर झाले नसते. कारण इथे गजेंद्रसिंहांच्या कर्तृत्वाचा मुद्दा करत आंदोलन केले गेले. पूर्वीच्या दिग्गजांची नावे घेऊन त्यांच्या तुलनेत गजेंद्रसिंह म्हणजे कोणीच नाहीत असे दाखवले गेले. अनुपम खेर सारख्या नटाने भर टीव्हीवर त्यांचा अपमान केला. अनुपम खेर यांनी तो अपमान करावा याचे हसू आले. हा नट सुरुवातीला "सारांश" सारख्या चित्रपटात गंभीर व्यक्तिरेखा करून पुढे बहुतेक सगळ्या चित्रपटांत अक्षरश: मर्कटलीला करीत जगला. "लम्हें" या चित्रपटात या इसमाने जे काही चाळे केले आहेत ते अभिनय या सदरात मोडत असतील, तसला अभिनय शिकवू नये म्हणून आंदोलन करायला हवे. तेव्हा, अभिनयाविषयी प्रेम बाळगून जर पोटतिडिकेने जर हा इसम या वादात पडला असेल तर त्याने आधी आपण पोट भरण्यासाठी किती तडजोडी केल्या हे पाहावे आणि जरा थंड घ्यावे. आधीच्या चेअरमनमध्ये श्याम बेनेगल, सईद अख्तर मिर्झा वगैरे लोकांची नावे घेतली जातात, गजेंद्रसिंहांची त्यांच्याशी तुलना केली जाते. आता बेनेगल मोठे नाव आहे, पण व्यावसायिकदृष्ट्या कितपत मोठे झाले ते? अनुपम खेरनेही त्यांच्या सिनेमापेक्षा इतर व्यावसायिक सिनेमे जास्त केले की नाही? चेअरमनचे काम आहे प्रशासनाचे. केंद्र सरकारच्या अनुदानाने ही संस्था चालते. त्यांची नेमणूक मान्य व्हायला हवी. श्याम बेनेगल चेअरमन होते म्हणून त्यावेळी विद्यार्थ्यांतून बेनेगल निर्माण झाले नाहीत किंवा यू. आर. अनंतमूर्ती होते म्हणून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली नाही.
हे आंदोलन असो, किंवा सध्या चाललेला पुरस्कार-परत करण्याचा फार्स असो, यात एक प्रकारची एकसूत्रता जाणवते. अशी आंदोलने आधी झाली नाहीत. मुद्दे तसेच होते, पण लेखकांना पुरस्कार परत करावेसे वाटले नाहीत. त्यावेळी त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर कुणी घाले घालत नव्हते. शिखांचे शिरकाण झाले तेव्हा त्यांची संवेदनशीलता बधीर होती, पण व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित असल्यामुळे पुरस्कार कपाटात चमकत होते आणि पुरस्काराची रक्कम ब्यांकेत व्याज मिळवत होती. तेवढ्यात मोदी सरकार आले आणि या व्यंकटांची खळी सांडली. आता सर्वत्र व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी दिसू लागली, सरकार उद्दाम वाटू लागले, मनमानी करणारे वाटू लागले, लोकशाही तिरडीवर बांधली गेली. थोडक्यात कॉंग्रेस लोकांना जे लोकशाहीचे फसवे वातावरण देऊन त्या पांघरुणाखाली जे काही "सरकाय लो खटिया जाडा लगे" करत होती ते या लोकांना बरे वाटत होते. आता स्वच्छ प्रशासन, शिस्त, गंभीरपणा, आचरटपणा करण्याला प्रोत्साहन नाही या गोष्टी मग लोकशाहीवर घाला वाटू लागल्या आहेत. कॉलेजमध्ये ड्रग्ज नको, सिगारेटी नकोत, दारू नको या गोष्टी आल्या की व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी वाटू लागली. सर्व स्तरावर, सर्व आघाड्यांवर मोदीविरोध हेच सूत्र यातून दिसून येते, मग यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे ओळखायला वेळ लागत नाही. जेव्हा विद्यार्थी आम्हाला चांगले प्रिन्सिपॉल पाहिजेत म्हणून आंदोलन करताना दिसतात तेव्हा ते खरे विद्यार्थी नाहीत हे कुणीही खरा विद्यार्थी (आजी किंवा माजी) ओळखेल.
खरं तर या विद्यार्थ्यांना फिल्म बनवण्याचा अप्रतिम धडा मिळाला. उगाच कुठला तरी "खंडहर" टाईप चित्रपट काढून निर्मात्याचे दिवाळे वाजवण्यापेक्षा, एकता कपूरसारखं कच्या बाराखडीचे कौटुंबिक ड्रामे करून टीआरपी वाढवणे खिशाला बरे पडते. फिटेइईंच्या विद्यार्थ्यांच्या या चाळ्याला ड्रामा एवढेच नाव देता येईल. मोदींनी या ड्राम्याला भीक घातली नाही हेच बरे झाले. ते घालणार नव्हतेच. लोकशाहीचा दुरुपयोग करणाऱ्या लोकांना हेच उत्तर बरे.