अनेक वर्षं उपेक्षित राहिलेल्या संघीय चड्डीला आता चांगले दिवस आले आहेत. इतके दिवस केवळ उत्तम वायूवीजन हा एकमेव प्लस पॉइन्ट म्हणून हे वस्त्र परिधान केलेले पृष्ठभाग आज मंत्रालयात खुर्च्यावर विसावले आहेत हा त्या चड्डीच्या यशाचा देदीप्यमान आलेख पाहण्यासारखा आहे. हे दिवस पाहण्यासाठी या चड्डीने किती खस्ता खाल्ल्या आहेत ते कॉंग्रेसच्या पांढऱ्या टोपीला नाही कळणार. गोणपाटाशी स्पर्धा करणारे कापड, मळखाऊ रंग, पोटाच्या विषुववृत्ताला आवळून धरण्यासाठी तिपदरी दोऱ्याने ओवलेली बटणे, भरभक्कम शिलाई, किमान अर्धा अर्धा किलो शेंगदाणे मावतील असे खिसे, एवंगुणविशिष्ट चड्डी ती. शिबीर असो, रोजची शाखा असो, दसऱ्याचे संचलन असो, चड्डीशिवाय स्वयंसेवक दिसत नाही. तेही बरेच म्हणा. चड्डीशिवाय स्वयंसेवक म्हणजे तुऱ्याशिवाय मोर. फक्त हा मोर पिसारा फुलवून नृत्य करीत नाही. पिसारा फुलवण्याचे काम खळ करते. कॉंग्रेसवाल्यांनी इतकी वर्षे जनतेच्या कमरेचे वस्त्र लुटून नेण्याचे सत्कार्य केले पण संघाच्या चड्डीला हात घालण्याचे धैर्य झाले नाही. संघाच्या शिस्तीप्रमाणे चड्डीची खळही कडक. त्यामुळे सैल लंगोटाच्या कॉंग्रेसला ते शक्यही झाले नसते. पण संघाचा अदृश्य हात मात्र या कॉंग्रेसवाल्यांना सगळीकडे दिसायचा. मुघल सेनेच्या घोड्यांना जसे संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसा. प. पू. इंदिराबाईंना तर मान्सून वेळेवर आला नाही तरी त्यात संघाचा कावा दिसायचा. जणू काही संघाने स्वयंसेवक अगदी पार श्रीलंकेच्या आखातात पाठवून आकाशात सेतू उभा करवून घेतला असावा असं त्यांना वाटायचं. मान्सून सोडा, बाथरूममध्ये अचानक पाणी बंद झालं तरी त्यात संघाचा हात असायचा. या हाताचा त्यांनी एवढा धसका घेतला की निवडणुकीचं चिन्हसुद्धा हातच ठरवलं. नशीब, ते "जेवण्या" हाताचं तरी ठेवलं. पुढे हा हात कुठेकुठे मारला गेला, कशाकशात गेला, कशानं बरबटला, कुठे साफ करून घेतला गेला, कुणाकुणाला दाखवला गेला हे सर्व आपल्या सर्वांना ठाऊक आहे. हे सगळं ठाऊक असूनही प.पू. माणकोजी महाराजांनी आपल्या प्रवचनात संघाच्या चड्डीचा उल्लेख केला. महाराजांच्या मते मुख्यमंत्रीपदाची अर्हता चड्डीवर अवलंबून होती. ज्याने जास्त वेळ ती टिकवून ठेवली तो खरा. महाराजांची मानसिकता जरा समजून घेतली पाहिजे. ते स्वत: हरू नावाच्या गावातून आले आहेत. जिंकू किंवा मरू असे ते कधीच म्हणत नाहीत. त्यातून कॉंग्रेसमध्ये आयुष्य गेले. कॉंग्रेसमध्ये स्वत:ची स्वत: चड्डी घालणाऱ्याना तिकिटे कधीच मिळत नाहीत. किंबहुना चड्डी घालणाऱ्याला कॉंग्रेसमध्ये काहीच मिळत नाही. चड्डी असो वा नसो, शुभ्र मुगुट मात्र हवा. मग तो गांधी घराण्याची धुणीभांडी करून मिळवलेला का असेना. लांगूलचालन करून मिळवलेल्या तिकीटापेक्षा संघाची चड्डी घालून, देशप्रेम, समाजप्रेम बाळगून खुर्ची मिळाली असेल तर ते बरंच आहे.
चड्डीची असूया असलेले अनेक आहेत. आमचे ते जाणते राजे, "आपला देश चड्डीवाल्यांच्या हातात देणार आहात काय?" अशी घनगर्जना करून "आपलं तसं काय नाय म्हणा, काय बटणं बिटणं तुटली तर सांगा आपल्याला. भायेरून टीप मारून देऊ. काय म्हंता? शिलाई? न्हाय ओ, भायेरून टीप मारायला कसली शिलाई? फक्त चड्डी सोडून ठेवा. म्हंजे, आमाला टीप मारायला मिशनीवर घ्याला बरी ओ. का हो, आश्लील जालं का?" असं काही तरी म्हणत शेवटी चड्डी धरून राहिले. अर्थात त्यांनी चड्डी धरायचं कारण म्हणजे दुसऱ्या कुणाला ती धरता येऊ नये एवढंच होतं म्हणा. मग सेनावाले बसलेच होते "आमी नाय जा चड्डी घालणार!" असं म्हणत हटून. खरं तर पूर्वी युती अशीच टिकली होती. तुम्ही चड्डी घाला, आम्ही कफनी घालतो. बरी आरामदायक असते कफनी. पण या खेपेला प्रसंगी नागवे बसू, पण चड्डी घालणार नाही अशी व्याघ्रगर्जना करून झाली. मग शिशिर ऋतू आला. झाली पंचाईत? कफनीही नाही आणि चड्डी तर घालायची नाही अशी प्रतिज्ञा. मग चड्डीवाल्यांनाच दया आली ना? बाबारे, आता तरी घाल चड्डी, फ़्रॉस्ट बाईट वाईट असतो बरं, बोटं तुटून पडली तर कळणारसुद्धा नाही असं सांगून झालं तरी हा नाथपंथी वाघ अडून बसला होता. थंडीत व्हायचं तेच झालं. "कासव" झालं अगदी! विरोध "मावळला". मग "आम्हाला चड्डी चढवा" अशी (एकदाची) आज्ञा झाली आणि कासव वाचलं. एकावर एक बारा चड्ड्या चढवल्या तेव्हा कुठं ऊब आली. महाराजांना चड्ड्या चढवल्या जात होत्या तेव्हाही ते कठोर चेहरा करून "खामोश! बघतोस काय? इथं कुणी नागवं उभं आहे का?" असं म्हणत होतेच. तेव्हा, चड्डीमाहात्म्य सगळे ओळखून आहेत.
ज्या चड्डीने खुर्चीत नसताना प्रचंड समाजोपयोगी काम केलं आहे ती अधिकारावर आल्यावर तर नक्कीच काम करेल. नैसर्गिक आपत्ती असो, मानवनिर्मित असो, ही चड्डीच सगळीकडे मदतीसाठी जाते आहे. काश्मीरमध्ये पुराने धुमाकूळ घातला तेव्हा पांढरे टोपीकुमार, झाडूकुमार सगळे आ वासून पाहत असताना संघाचे कार्यकर्ते तिथे पोचून मदत करत होते. बारामतीचे जाणते राजे जेव्हा आपण सेक्युलर असं सांगत संभाजी ब्रिगेडसारखी पिलावळ निर्माण करत होते तेव्हा संघाच्या शाखेत "केवळ राष्ट्रधर्म हा हिंदुधर्म" हे शिकवले जात होते. संघाची चड्डी जो देशाला जननी मानतो अशा सर्व भारतीयांसाठी आहे. अशी चड्डी आदर्श इमारती उभारण्यापेक्षा आदर्श समाज उभा करेल. प्रगतीची कामे करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवणे हे तर सरकारचे कर्तव्यच आहे, ते तर होईलच. पण आजवर भारतीय माणसाला अभिमान बाळगण्यासारखे काही नव्हते, स्वाभिमानी जगणे माहीत नव्हते, आपल्या देशाचे काही भले होईल याचा विश्वास नव्हता, तो तरी या चड्डीने मिळवून दिला आहे. होय ना माणकूशेठ? तेव्हा असल्या आंबट ढेकरा देण्यापेक्षा कमी खा, कमी बोला, जास्त काम करा. तुमच्या आजूबाजूचे हवामान तर चांगले राहीलच, शिवाय तुम्हीही निरोगी राहाल.
चड्डीची असूया असलेले अनेक आहेत. आमचे ते जाणते राजे, "आपला देश चड्डीवाल्यांच्या हातात देणार आहात काय?" अशी घनगर्जना करून "आपलं तसं काय नाय म्हणा, काय बटणं बिटणं तुटली तर सांगा आपल्याला. भायेरून टीप मारून देऊ. काय म्हंता? शिलाई? न्हाय ओ, भायेरून टीप मारायला कसली शिलाई? फक्त चड्डी सोडून ठेवा. म्हंजे, आमाला टीप मारायला मिशनीवर घ्याला बरी ओ. का हो, आश्लील जालं का?" असं काही तरी म्हणत शेवटी चड्डी धरून राहिले. अर्थात त्यांनी चड्डी धरायचं कारण म्हणजे दुसऱ्या कुणाला ती धरता येऊ नये एवढंच होतं म्हणा. मग सेनावाले बसलेच होते "आमी नाय जा चड्डी घालणार!" असं म्हणत हटून. खरं तर पूर्वी युती अशीच टिकली होती. तुम्ही चड्डी घाला, आम्ही कफनी घालतो. बरी आरामदायक असते कफनी. पण या खेपेला प्रसंगी नागवे बसू, पण चड्डी घालणार नाही अशी व्याघ्रगर्जना करून झाली. मग शिशिर ऋतू आला. झाली पंचाईत? कफनीही नाही आणि चड्डी तर घालायची नाही अशी प्रतिज्ञा. मग चड्डीवाल्यांनाच दया आली ना? बाबारे, आता तरी घाल चड्डी, फ़्रॉस्ट बाईट वाईट असतो बरं, बोटं तुटून पडली तर कळणारसुद्धा नाही असं सांगून झालं तरी हा नाथपंथी वाघ अडून बसला होता. थंडीत व्हायचं तेच झालं. "कासव" झालं अगदी! विरोध "मावळला". मग "आम्हाला चड्डी चढवा" अशी (एकदाची) आज्ञा झाली आणि कासव वाचलं. एकावर एक बारा चड्ड्या चढवल्या तेव्हा कुठं ऊब आली. महाराजांना चड्ड्या चढवल्या जात होत्या तेव्हाही ते कठोर चेहरा करून "खामोश! बघतोस काय? इथं कुणी नागवं उभं आहे का?" असं म्हणत होतेच. तेव्हा, चड्डीमाहात्म्य सगळे ओळखून आहेत.
ज्या चड्डीने खुर्चीत नसताना प्रचंड समाजोपयोगी काम केलं आहे ती अधिकारावर आल्यावर तर नक्कीच काम करेल. नैसर्गिक आपत्ती असो, मानवनिर्मित असो, ही चड्डीच सगळीकडे मदतीसाठी जाते आहे. काश्मीरमध्ये पुराने धुमाकूळ घातला तेव्हा पांढरे टोपीकुमार, झाडूकुमार सगळे आ वासून पाहत असताना संघाचे कार्यकर्ते तिथे पोचून मदत करत होते. बारामतीचे जाणते राजे जेव्हा आपण सेक्युलर असं सांगत संभाजी ब्रिगेडसारखी पिलावळ निर्माण करत होते तेव्हा संघाच्या शाखेत "केवळ राष्ट्रधर्म हा हिंदुधर्म" हे शिकवले जात होते. संघाची चड्डी जो देशाला जननी मानतो अशा सर्व भारतीयांसाठी आहे. अशी चड्डी आदर्श इमारती उभारण्यापेक्षा आदर्श समाज उभा करेल. प्रगतीची कामे करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवणे हे तर सरकारचे कर्तव्यच आहे, ते तर होईलच. पण आजवर भारतीय माणसाला अभिमान बाळगण्यासारखे काही नव्हते, स्वाभिमानी जगणे माहीत नव्हते, आपल्या देशाचे काही भले होईल याचा विश्वास नव्हता, तो तरी या चड्डीने मिळवून दिला आहे. होय ना माणकूशेठ? तेव्हा असल्या आंबट ढेकरा देण्यापेक्षा कमी खा, कमी बोला, जास्त काम करा. तुमच्या आजूबाजूचे हवामान तर चांगले राहीलच, शिवाय तुम्हीही निरोगी राहाल.
No comments:
Post a Comment