दुर्योधन बोलतासा
रे दुःशासना वांयच ऐक माजा
सकाळ सकाळ नको रे
चाय आणि खाजा
कौरवांचो मान जरा ठेय
पांडव बग कशे मारतंत मजा
दुःशासन बोलता
काय केल्यांनी आता पांडवांनी
एक दिवस पण जगूचा नाय धडपणी
तू बसतंय घेवन नवटाक नवटाक फेणी
मांयझयो माझो हो चा पण लागता फुळकवणी
दुर्योधन बोलतासा
आयक रे जरा तोंड बंद ठेय
आज व्हॅलेंटाईन तेची कर कायतरी सोय
द्रौपदीन आज मेकअप केल्यान ऐकलंय
वांयच जावन जरा बघूया विचार करतंय
दुःशासन बोलता
होय रे होय मी तेका मगाशीच बघितलंय
पानदीतसून जाय होता विदुराच्या घराकडे
बरी गावली म्हणान गेलंय तर
वशाडी ईली हो कृष्ण येवन उभो रवलो पुढे
माका सांगता नवीन घर बांधल्यानी
तुमच्या चौपट कार्पेट एरिया केल्यानी
संध्याकाळी म्हाळ आसा या सगळ्यांनी
बरोबर घेवन या तुमच्या व्हॅलेंटायनी
दुर्योधन बोलतासा
आवशीक.. आमच्या खंयच्या व्हॅलेंटायनी
जी होती तेका पांडवानी केली आमची वयनी
आणि म्हाळाक जावन करूचा तरी काय
वाटाण्याचा सांबारा घावणे खांवचा की काय
कृष्ण प्रकट होऊन बोलतासा
सुधरा रे मांयझंयांनो आता तरी
दुःशासना तू तर एक नंबर पदरधरी
दुर्योधना, द्रौपदीकडे तू बघूपण नको
तोंड वर करून चाललंस तर पडतलंय
ह्या विसरा नुको..
अशा शब्दांत श्रीकृष्णान दुर्योधनाची आवाजी बंद केल्यान एकाच श्लोकात..
इतिश्री व्हॅलेंटाईन सप्ताह प्रपोजाध्यायः॥
#मालवणी_गजालगीता
No comments:
Post a Comment