कृष्ण बोलतासा
रे पार्था, ऊठ, युद्धाचो दिवस जवळ आयलो
धनुष्य बघ बाण बघ टायम कमी रवलो
पण युद्धाचा काय होईत ता होईत
घरचा युद्ध शांत करूचा बघ पयलो
अर्जुन बोलता
उठतंय रे कृष्णा, झोपतंय अजून अर्धो कलाक
अस्वलापाठी धावन कमरेक आयलोसा बाक
तुका गीता सांगूची आसा मोठी हौस
मी आपलो ऐकतंय म्हणान तू माकाच घेवन बस
कृष्ण बोलता
कर्म करणाऱ्याकच देवचा लागता कर्माचा ज्ञान
नांगराक जुपलो म्हणान तर पोळ्याक बैलाचो मान
एकशे पाचांत तू माझो लाडको आणि द्रौपदी चेडू
खटखट्ये लाडवात जसो बुंदीचो मऊसर लाडू
द्रौपदी बाहेर येवन बोलता
ओ दादानू, तुमी तेंका कायेक सांगू नकात
दोन तास अजून पसरतले सुशेगात
दोन म्हैने सांगतंय रथाचा चाक बदलूक झाला
माका सांगतंत अण्णा गेलो गावाक
रथाचा स्पेअर चाक तेच्या दुकानात इसारला
कृष्ण बोलता
रे अर्जुना! मांयझंया हडे ये जरा सायटीक
आजचो दिवस वचनाचो, जा जरा भेटीक
सांग तेका चाकाचा काय घेवन बसलंय
ह्या एक युद्ध कायता होऊन जांवदेत
तुका चकचकित बीएमडब्लू आणून दितंय
अर्जुन बोलतासा
रे मधुसूदना, तू पाच गावां पण आमका देवक नाय
रोज अकाऊंट बघतंय बॅलन्स चार रुपयांच्या वर नाय
आणि जरी बीएमडब्ल्यू घेतलंय
तरी वासुदेवा सांग, तेच्या टाकीत घालूचा तरी काय
कृष्ण बोलता
म्हणानच तुका सांगतंय आपण कर्म करूचा
फळ इला तर इला नाय तर गप रवूचा
तू वचन दिल्यार द्रुपग्याक आनंद जातलो
तेका आनंद झालो तर
युधिष्ठिराआधी तुझो नंबर लागतलो
अशा शब्दात कृष्णान गृहस्थाश्रमाचा गुह्य एकदमच स्पष्ट केल्यान या अध्यायात.
इतिश्री व्हॅलेंटाईन प्रॉमिसोध्यायः॥
#मालवणी_गजालगीता
No comments:
Post a Comment