अर्जुन बोलतासा
रे कृष्णा,हो सप्तो काय माका लाभाक नाय
मगे प्रयत्न तरी कशाक करूचे सांगशीत काय
तुका सांगूक काय कर्माचो सिद्धांत
कलमाक आंबो जांवदे, तोरां तरी येऊ नाय?
दुर्योधन बोलता
माकाही वाटता माझी तीच अवस्था झाली आसा
डोक्यार मुगुट पण खाली उघडा उघडा वाटतासा
आता द्रौपदी जांवदे
भानुमतीकडेच आता काय ती थोडी तरी आशा
दुःशासन बोलता
रे आमका काय्येक फरक पडूचो नाय
गडग्याच्या दगडाक उन्हाचा भय ता काय
तू जा कसो भानुमतीकडे
माझी चारुमती बरी, मी तेच्या मागे मागे जाय
कर्ण बोलतासा
हे वृषाली, माझा उत्तरीय खंय ठेयलंस
माझी कवचकुंडला कशाक लपवलंस
व्हॅलेंटाईन आज मगे
माझे सगळे पितांबर वाळत कशाक घातलंस?
नकुल बोलता
रे वासुदेवा, आमची काय तरी बघ सोय
सगळ्यांका मिळता आंबो, आमका मात्र कोय
व्हॅलेंटाईनचा नसता काय ता ह्या झेंगाट
आमच्या नशिबी मात्र घोड्यांचो थयथयाट
धृतराष्ट्र म्हणता
ऐकलंस काय गो दुर्योधन काय म्हणताहा
दुर्यौधनान आणि एक खूळ हाडल्यान हा
म्हणता डॅड डॅड पार्टी करू या
मामाकडून गांधाराची फेमस पावडर मागवया
गांधारी करवादता
बापलेक तुमका काय होया ता करा
हस्तिनापुराचो कळंगुट बीच करा
पावडर घेया नाय तर गुळी
मी येवचंय नाय माका मापी करा
कृष्ण बोलता
रे अर्जुना, बघितलंय मां एकेकाची कथा
माणूस समाधानी रवना नाय हीच खरी व्यथा
तुका आस द्रौपदीच्या मिठीची असता
ओ माजी बडबड ऐका ही तिची आस रवता
बायलेक आजवर कोण्येक समजूक नाय
सत्यभामा रुक्मिणीचे पण मातीचेच पाय
म्हणतंत, गावाची भांडणा सोडवतंत गो बाय
पण तुम्ही आमचा काय्येक ऐकनंत नाय
तस्मात् पार्था, आणी बाकीचे तुमी,
खरो व्हॅलेंटाईन बडबड ऐकणारो असता
गुलाब देवन कान बंद ठेवन बसणारो असता
दोन तास गप रव ऐकान घेतल्यात
तरच घरी इल्यार खरा सेलेब्रेशन जाता
इतिश्री व्हॅलेंटाईन अंतिमोध्यायः॥
समाप्त
#मालवणी_गजालगीता