Thursday, March 9, 2023

गजालगीता महाभारत पर्व - अंतिमोध्यायः

अर्जुन बोलतासा

रे कृष्णा,हो सप्तो काय माका लाभाक नाय

मगे प्रयत्न तरी कशाक करूचे सांगशीत काय

तुका सांगूक काय कर्माचो सिद्धांत

कलमाक आंबो जांवदे, तोरां तरी येऊ नाय?


दुर्योधन बोलता

माकाही वाटता माझी तीच अवस्था झाली आसा

डोक्यार मुगुट पण खाली उघडा उघडा वाटतासा

आता द्रौपदी जांवदे

भानुमतीकडेच आता काय ती थोडी तरी आशा


दुःशासन बोलता

रे आमका काय्येक फरक पडूचो नाय

गडग्याच्या दगडाक उन्हाचा भय ता काय

तू जा कसो भानुमतीकडे

माझी चारुमती बरी, मी तेच्या मागे मागे जाय


कर्ण बोलतासा

हे वृषाली, माझा उत्तरीय खंय ठेयलंस

माझी कवचकुंडला कशाक लपवलंस

व्हॅलेंटाईन आज मगे

माझे सगळे पितांबर वाळत कशाक घातलंस?


नकुल बोलता

रे वासुदेवा, आमची काय तरी बघ सोय

सगळ्यांका मिळता आंबो, आमका मात्र कोय

व्हॅलेंटाईनचा नसता काय ता ह्या झेंगाट

आमच्या नशिबी मात्र घोड्यांचो थयथयाट


धृतराष्ट्र म्हणता

ऐकलंस काय गो दुर्योधन काय म्हणताहा

दुर्यौधनान आणि एक खूळ हाडल्यान हा

म्हणता डॅड डॅड पार्टी करू या

मामाकडून गांधाराची फेमस पावडर मागवया


गांधारी करवादता

बापलेक तुमका काय होया ता करा

हस्तिनापुराचो कळंगुट बीच करा

पावडर घेया नाय तर गुळी

मी येवचंय नाय माका मापी करा


कृष्ण बोलता

रे अर्जुना, बघितलंय मां एकेकाची कथा  

माणूस समाधानी रवना नाय हीच खरी व्यथा

तुका आस द्रौपदीच्या मिठीची असता

ओ माजी बडबड ऐका ही तिची आस रवता


बायलेक आजवर कोण्येक समजूक नाय

सत्यभामा रुक्मिणीचे पण मातीचेच पाय

म्हणतंत, गावाची भांडणा सोडवतंत गो बाय

पण तुम्ही आमचा काय्येक ऐकनंत नाय


तस्मात् पार्था, आणी बाकीचे तुमी,

खरो व्हॅलेंटाईन बडबड ऐकणारो असता

गुलाब देवन कान बंद ठेवन बसणारो असता

दोन तास गप रव ऐकान घेतल्यात 

तरच घरी इल्यार खरा सेलेब्रेशन जाता


इतिश्री व्हॅलेंटाईन अंतिमोध्यायः॥


समाप्त


#मालवणी_गजालगीता

गजालगीता महाभारत पर्व - चुंबनोध्यायः

दुःशासन बोलतासा

दुर्योधना रे, आम्ही अशे कशे कमनशिबी

लुगडी उचलणारे जशे द्रौपदीचे धोबी

सगळे चान्स तुका होये

शिरां पडली, अरे आमका एक तरी चान्स दी


दुर्योधन बोलता

मांयझंया आधी मी सांगतंय ती कामा कर

आजचो द्रौपदीचो प्लॅन कायहा म्हायती कर

मगे भालेकराक फोन कर

मच्छीची दोन थाळ्ये रिजर्व सांग ठेवक सत्वर


हंयसर द्रौपदी लाडात येवन म्हणा आसा

काय हो कौंतेय, माझ्या मनात एक विचार आयलो

सांगा की सांगा नको.. काल एक दागिनो दिसलो

घेतात काय हो आज, 

घेतल्यात तर.. तर..तुमका माझो किस भेटतलो..


अर्जुन बोलता

रे कृष्णा!! वासुदेवा! ह्या मी काय ऐकतंसय

मुंगीन मेरू पर्वत गिळून तर नाय टाकलंय

कर्म, आजच हेका ह्या सुचला

मी आत्ताच बोंबलाची चटणी भाकरी खावन बसलंय


कृष्ण बोलतासा

रे अर्जुना, हेका म्हणतंत नियतीचो फाको

लक्ष नसताना पडलेलो कर्मफळाचो फटको

ठेयली लिपस्टिक ओठांची अपेक्षा 

प्रत्यक्षात टोचता भरघोस मिशांचो झुपको


अर्जुन बोलतासा

शी शी कृष्णा, वशाडी इली तुज्यार ती

सल्लो मागतंय तर तू लावतंय पनवती

आजचो दिवस कसो चुंबनाचो

पण डोळ्यासमोर हाडलंस दुर्योधनाची मूर्ती


आमचा नशीबच म्हणतंत फुटक्या की काय ता 

चुंबनाचा आज काय होऊचा नायसा दिसता

जरा खंय मी जवळ जातंय 

तर म्हणता तुमच्या तोंडाक कांद्याचो वास मारता


कृष्ण बोलतासा

न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगतलंय चार

बाकीचा सोड माका प्लॅन तरी इचार

भालेकराकडे घेवन जा द्रौपदीक

सांग,मी दुर्योधन, होया माका टेबल फॉर चार


भालेकराकडचा डिनर तुझी सेटिंग करतला

तळलेलो बांगडो आणि सुरमईत काम जातला

खरो दागिनो होयो कशाक

तिसऱ्यांचा कालवण तुका किस देवन जातला


तर अशा शब्दात कृष्णान अर्जुन द्रौपद्येची सोय आणि दुर्योधनाचो प्लॅन चौपट केल्यान या अध्यायात.


इतिश्री व्हॅलेंटाईन चुंबनोध्यायः॥


#मालवणी_गजालगीता

गजालगीता महाभारत पर्व - हग-गोध्यायः

नकुल बोलतासा

रे सहदेवा वांयच माझा ऐकतंस काय

गोठ्यात्सून भायर जरा येशीत काय

दादान सक्काळी आज्ञा दिल्यान

धेनु आपली, तेका सजवन तयार करशात काय


सहदेव बोलता

भैनीक, आवशीक, आमकाच हो कामा सांगता

तो भीम बघ कसो गदा घेवन गावभर फिरता

व्हॅलेंटाईन यांचो जातलो

हडे आमी मात्र गाडयेवर भजी पाव खातलो


द्रौपदी गुणगुणता

बाय गोऽऽ कस्सं करमत नाही गो..बाई गो

काल अस्वल झाला आजचो काय उजेड गो

बभ्रुवाहनाचे बाबा, ऐकल्यात काय हो 

आज मेणबत्त्ये लावन काय ता डिनर करुया काय हो


अर्जुन बोलतासा

होय गे होय! आजचो दिवसच खास आसा

तरी मी म्हणा होतंय आंघोळ करूशी वाटतासा

पण ह्या काय? वशाडी इली नशिबार 

युधिष्ठिरान माका क्यान्सल करुन आपलो नंबर लावलोसा


रे कृष्णा, आज खंय गेलंय तू माका सोडान

गोष्टी युक्तीचे चार होये होते आज आईच्यान

कधी नाय तो मिठी मारूचो चान्स

पण युधिष्ठिरान माका माशे पागूक बसयल्यान


युधिष्ठिर येता

हे भ्राताश्री म्हायती आसा मां आज काय आसा

हस्तिनापुरात पयल्यांदाच ह्या करूचा आसा

जा सगळ्या भावांक बोलावून हाड

हे द्रौपदी तुमी पण तयार होवन बसा

सगळ्यांनी मिळून करूचा मी सांगतंय तसा


द्रौपदी आरडता

ओ तुमच्या जिभेचा हाड मोडला काय ओ

एकाच येळेक पाची येवक मी काय मुन्शिपाल्टीची बांव काय हो

काय बाये तरी एकेक ही पांडवांची नक्षत्रां

हेडएकच झालोहा पदरात पडली ही पात्रा


युधिष्ठिर हहहह करून बोलता

गे माझे बाये, तुझो गैरसमज झालो वाटता

आजचो दिवस मोठो शुभ असता

आरतीचा तबक घेवन गोठ्यात ये

आज गाईक मिठी मारून ओवाळूचा असता


आम्ही भाव भाव गाईक वंदन करतलो

तेची शेपूट हातात घेवन डोळ्यांक लावतलो

हे द्रौपदी, तू गाईवांगडा रव

आजचो सगळो स्वैपाक हो भीम करतलो


अशा प्रकारे युधिष्ठिरान गाईक आणि द्रौपदीक एकाच वेळेक आनंदी केल्यान या अध्यायात.


इतिश्री व्हॅलेंटाईन हग-गोध्यायः॥


#मालवणी_गजालगीता

गजालगीता महाभारत पर्व - प्रॉमिसोध्यायः

कृष्ण बोलतासा

रे पार्था, ऊठ, युद्धाचो दिवस जवळ आयलो

धनुष्य बघ बाण बघ टायम कमी रवलो

पण युद्धाचा काय होईत ता होईत

घरचा युद्ध शांत करूचा बघ पयलो


अर्जुन बोलता

उठतंय रे कृष्णा, झोपतंय अजून अर्धो कलाक

अस्वलापाठी धावन कमरेक आयलोसा बाक

तुका गीता सांगूची आसा मोठी हौस

मी आपलो ऐकतंय म्हणान तू माकाच घेवन बस


कृष्ण बोलता

कर्म करणाऱ्याकच देवचा लागता कर्माचा ज्ञान

नांगराक जुपलो म्हणान तर पोळ्याक बैलाचो मान

एकशे पाचांत तू माझो लाडको आणि द्रौपदी चेडू

खटखट्ये लाडवात जसो बुंदीचो मऊसर लाडू


द्रौपदी बाहेर येवन बोलता

ओ दादानू, तुमी तेंका कायेक सांगू नकात

दोन तास अजून पसरतले सुशेगात

दोन म्हैने सांगतंय रथाचा चाक बदलूक झाला

माका सांगतंत अण्णा गेलो गावाक

रथाचा स्पेअर चाक तेच्या दुकानात इसारला


कृष्ण बोलता

रे अर्जुना! मांयझंया हडे ये जरा सायटीक

आजचो दिवस वचनाचो, जा जरा भेटीक

सांग तेका चाकाचा काय घेवन बसलंय

ह्या एक युद्ध कायता होऊन जांवदेत

तुका चकचकित बीएमडब्लू आणून दितंय


अर्जुन बोलतासा

रे मधुसूदना, तू पाच गावां पण आमका देवक नाय

रोज अकाऊंट बघतंय बॅलन्स चार रुपयांच्या वर नाय

आणि जरी बीएमडब्ल्यू घेतलंय

तरी वासुदेवा सांग, तेच्या टाकीत घालूचा तरी काय


कृष्ण बोलता

म्हणानच तुका सांगतंय आपण कर्म करूचा

फळ इला तर इला नाय तर गप रवूचा

तू वचन दिल्यार द्रुपग्याक आनंद जातलो

तेका आनंद झालो तर

युधिष्ठिराआधी तुझो नंबर लागतलो


अशा शब्दात कृष्णान गृहस्थाश्रमाचा गुह्य एकदमच स्पष्ट केल्यान या अध्यायात.


इतिश्री व्हॅलेंटाईन प्रॉमिसोध्यायः॥


#मालवणी_गजालगीता

गजालगीता महाभारत पर्व - अस्वलोध्यायः

दुर्योधन बोलता

रे अर्जुना, धनुर्विद्या आत्मसात केलंय

फायनल एक्झामात टॉप केलंय

माशाचो डोळो फोडून द्रौपदेक पळयलंय

वर्गात पयलो इलंय..

मगे आता आमचे वांधे कशाक करतंय


बायलेक कॅडबरी काय देतंय

तेका गजरो काय हाडून देतंय

आमची बाईल म्हणता शिरां पडली

आता मी पण पाच घोव शोधतंय


अर्जुन बोलता

दुर्योधना, मांयझंया कायतरी बोला नुको

वडाची साल पिपळाक लाव नुको

तुका काय आमची दुखा ठावक

आमका अपॉइंटमेंट घेवक लागता

युधिष्ठिराक मात्र डायरेक ॲक्सेस मिळता


आज मी जरा सावध आसंय

पहिलोच जावन कृष्णाक इचारून इलंय

पयल्यांदी माका चार गाळये दिल्यान

आणि मगे अस्वलाचा पोर आणूक सांगल्यान


द्रौपदी करवादता

अगो बाये माज्या! माज्यासाटी हाडल्यानी दिसता

रवळनाथान हेंका अक्कल दिली नायशी वाटता

हंयसर बाईल रवता दोन लुगड्यांवर

आणि यांचो सातबारा कृष्णाच्या नावावर


ओ! तुमची अक्कल खंय चराक गेली काय

ह्या अस्वल घरात हाडलंत तेचा करूचा काय

थोरल्याचो हत्ती, धाकल्यांचे घोडे घरात फिरतंत

आता हो प्राणी हाडून काय सर्कस लावतसंत?


कृष्ण बोलता

रे अर्जुना, असो कसो रे तू सांगकामी

खरा अस्वल आणूक नाय सांगूक मी

पळ, आधी पावसकराच्या दुकानात धाव

कापूस भरलेलो टेडी घे, आणि करू नको भाव


अशा शब्दांत कृष्णान पुन्हा एकदा अर्जुनाक मांगरात झोपण्यापासून वाचवल्यान.


इतिश्री व्हॅलेंटाईन अस्वलोध्यायः॥


#मालवणी_गजालगीता

गजालगीता महाभारत पर्व - चॉकलेटाध्यायः

अर्जुन बोलतासा

गो पांचाली, मी सकाळपासून बघतंय

तू माका जरा कशीशीच दिसतंय

राजपुत्राचो मान तू काय नाय ठेयनंय

माका चा पन गुळाचो बनवन दिलंय


काय चल्लाहा काय तुझ्या मनात

असो काय गुन्हो मी केलंय म्हणात

स्वयंवरात माजो केवडो रुबाब होतो

पांडूचो झिलगो म्हणान माका मान होतो


तू इल्यापासून माझा धनुष्य 

खुंटीवर टांगलेला आसा

डोळो फोडलेलो पोपट पण म्हणता

माझाच ब्रह्मचर्य बरा आसा


तुका रुसून बसाक झाला तरी काय

काल गजरो दिलंय तो पण माळूक नाय

बरे पेडये गावलेले बाजारात काल

पण वाटता आज मिळतली पेज नि डाळ


पांचाली स्वतःशीच बोलता

बाये हेंच्यावांगडा बोलूचा तरी काय

सांगितल्याशिवाय एक गोष्ट करनंत नाय

कालपासून सांगा होतंय आज काय ता

माणूस व्हाळाकडे जाऊन इलो आणि तरी विचारता


काय्येक होऊक नाय माका गप रवा

सोरट्ये खेळूची प्रॅक्टिस चालू ठेवा

एकाय भावाक नाय बायलेची काळजी

आणि सासू थंयसून आरडता

मेरे करन अर्जुन आयेंगे जी


कृष्ण बोलतासा

अरे पार्था सामको खुळो मरे तू

सगळ्या भावंडांत जरा तरी बरो तू

पयलो जा कसो धावत बाजारात

कॅडबरी धा रुपायची हाडून

दे पांचालीच्या हातात


अशा प्रकारे कृष्णान अर्जुनाक सक्काळी सक्काळी धा रुपयांची पनवती लावल्यान. 


इतिश्री व्हॅलेंटाईन चॉकलेटाध्यायः॥


#मालवणी_गजालगीता

गजालगीता महाभारत पर्व - प्रपोजाध्यायः

दुर्योधन बोलतासा

रे दुःशासना वांयच ऐक माजा

सकाळ सकाळ नको रे 

चाय आणि खाजा

कौरवांचो मान जरा ठेय

पांडव बग कशे मारतंत मजा


दुःशासन बोलता

काय केल्यांनी आता पांडवांनी

एक दिवस पण जगूचा नाय धडपणी

तू बसतंय घेवन नवटाक नवटाक फेणी

मांयझयो माझो हो चा पण लागता फुळकवणी


दुर्योधन बोलतासा 

आयक रे जरा तोंड बंद ठेय

आज व्हॅलेंटाईन तेची कर कायतरी सोय

द्रौपदीन आज मेकअप केल्यान ऐकलंय

वांयच जावन जरा बघूया विचार करतंय


दुःशासन बोलता

होय रे होय मी तेका मगाशीच बघितलंय

पानदीतसून जाय होता विदुराच्या घराकडे

बरी गावली म्हणान गेलंय तर

वशाडी ईली हो कृष्ण येवन उभो रवलो पुढे


माका सांगता नवीन घर बांधल्यानी

तुमच्या चौपट कार्पेट एरिया केल्यानी

संध्याकाळी म्हाळ आसा या सगळ्यांनी

बरोबर घेवन या तुमच्या व्हॅलेंटायनी


दुर्योधन बोलतासा

आवशीक.. आमच्या खंयच्या व्हॅलेंटायनी

जी होती तेका पांडवानी केली आमची वयनी

आणि म्हाळाक जावन करूचा तरी काय

वाटाण्याचा सांबारा घावणे खांवचा की काय


कृष्ण प्रकट होऊन बोलतासा

सुधरा रे मांयझंयांनो आता तरी

दुःशासना तू तर एक नंबर पदरधरी

दुर्योधना, द्रौपदीकडे तू बघूपण नको

तोंड वर करून चाललंस तर पडतलंय

ह्या विसरा नुको..


अशा शब्दांत श्रीकृष्णान दुर्योधनाची आवाजी बंद केल्यान एकाच श्लोकात..


इतिश्री व्हॅलेंटाईन सप्ताह प्रपोजाध्यायः॥


#मालवणी_गजालगीता